राज्यात पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज (सोमवारी) दि. 20 मे 2024 रोजी 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले. सहा वाजेपर्यंत रांगेत उभा असणाऱ्या सर्व मतदारांना मतदान करता येईल, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात होऊ घातलेल्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मध्ये मुंबईतील सहा मतदारसंघात प्रमुख लढतीमध्ये उत्तर मुंबईतील मतदारसंघात भाजपचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील, उत्तर पूर्व मुंबईतून भाजपचे मिहीर कोटेचा विरूद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे रवींद्र वायकर विरूद्ध ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर, दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरूद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई, तर दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्यात लोकसभेची लढत होत आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय मतदान झालेली टक्केवारी पुढीलप्रमाणे :
भिवंडी- 48.89 टक्के
धुळे- 48.81 टक्के
दिंडोरी- 57.06 टक्के
कल्याण – 41.70 टक्के
मुंबई उत्तर – 46.91 टक्के
मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के
मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के
मुंबई दक्षिण – 44.22 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के
नाशिक – 51.16 टक्के
पालघर- 54.32 टक्के
ठाणे – 45.38 टक्के.