अपहरण करुन खून करणाऱ्या संशयितांना अवघ्या दोन तासात अटक – changbhalanews
क्राइम

अपहरण करुन खून करणाऱ्या संशयितांना अवघ्या दोन तासात अटक

कराड डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी

कराड | प्रतिनिधी
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील ओगलेवाडी परीसरातील राजमाची-हजारमाची भागात प्रेम प्रकरणातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयतांना अवघ्या दोन तासात अटक करण्याची धडाकेबाज कामगिरी कराड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली आहे.

याबाबत पोलीसांकडील माहिती अशी, नातेवाईक मुलगी ही कराड जवळच्या राजमाची- हजारमाची येथील प्रवीण पवार पळून याच्यासोबत पळून गेल्याच्या संशयावरून पवार याचा भाऊ व वडील, आई व अन्य एकास मारहाण झाली होती. यामधील जनार्दन गुरव यांचे अपहरण करून त्यांना सुर्ली घाटात नेऊन मारहाण झाली होती. त्यामध्ये गुरव यांचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी खुनाचा गुन्हा कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्हयातील 6 संशयीत आरोपींना कराड शहर डी बी पथकाने अवघ्या दोन तासात लोकेशन व गोपनिय बातमीदाराच्या मदतीने अटक केली आहे. अन्य संशयीतांचा कसून शोध घेण्यात येत आहे. अटक केलेल्या संशयीतांना 6 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डांगे, पोलीस उपनिरीक्षक पवार, स. फौ. संजय देवकुळे, हवालदार सचिन सुर्यवंशी, शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, धिरज कोरडे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close