लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान शांततेत ; अंदाजे 60.22 टक्के मतदान

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये आज दि.19 एप्रिल 2024 रोजी शांततेत मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाले , अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
पहिल्या टप्प्यातील एकूण पाच लोकसभा मतदार संघापैकी सर्वात कमी नागपूर मतदार संघात 53.71 टक्के तर सर्वात जास्त गडचिरोली-चिमूर मतदार संघात 67.17 टक्के इतके मतदान झाले.
पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
9 – रामटेक 58.50 टक्के,
10 – नागपूर 53.71 टक्के,
11- भंडारा- गोंदिया 64.08 टक्के,
12 -गडचिरोली- चिमूर 67.17 टक्के
आणि 13 – चंद्रपूर 60.03 टक्के.
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल
राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत रायगड लोकसभा मतदार संघात २८ उमेदवारांचे ४० अर्ज, बारामती – ५१ उमेदवारांचे ६६ अर्ज, उस्मानाबाद – ३६ उमेदवारांचे ७७ अर्ज, लातूर – ३६ उमेदवारांचे ५० अर्ज, सोलापूर – ४१ उमेदवारांचे ५३ अर्ज, माढा – ४२ उमेदवारांचे ५५ अर्ज, सांगली – ३० उमेदवारांचे ३९ अर्ज, सातारा – २४ उमेदवारांचे ३३ अर्ज, रत्नागिरी -सिंधुदुर्ग – ९ उमेदवारांचे १३ अर्ज, कोल्हापूर – २८ उमेदवारांचे ४१ अर्ज आणि हातकणंगले मतदारसंघात ३६ उमेदवारांचे ५५ अर्ज दाखल झाले आहेत.