चार लाखांचे मोबाईल कराड ग्रामीण पोलिसांमुळे मिळाले परत
तक्रारदार मालकांत समाधान ; पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले तब्बल चार लाख रुपये किंमतीचे 15 मोबाईल संच कराड ग्रामीण पोलिसांनी शोध घेऊन मूळ मालकांना परत दिले आहेत. दरम्यान, या कामगिरीबद्दल कराड ग्रामीण पोलीस व कराड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकारी यांना सीईआयआर पोर्टलद्वारे पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन शोध घेणेबाबत मिंटीग घेवुन सुचना दिल्या होत्या. त्यांचे मार्गदर्शानाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या सूचनेनुसार सपोनि अमित बाबर, उपनिरीक्षक सचिन भिलारी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे, सचिन निकम यांनी बिहार, उत्तरप्रदेश राज्यातुन तसेच महाराष्ट्रातील संभाजीनगर, अहमदनगर, सोलापुर, पुणे जिल्ह्यातुन तांत्रिक तपास करून पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले मोबाईल फोन संच प्राप्त केले. पोलिसांनी प्राप्त केलेले चार लाख रुपये किंमतीचे महागडे 15 मोबाईल फोन संच आज (सोमवार, दि. 10 जून रोजी ) सर्व मूळ मालक असलेल्या तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे हस्ते देण्यात आले. गहाळ झालेले मोबाईल फोन परत मिळालेने तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर, पोउनि सचिन भिलारी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे यांनी केली आहे.