इंग्रजी हा विषय नव्हे तर भाषा म्हणून शिकवणे गरजेचे- प्रा. सुनील आयवळे
घरनिकी येथे इंग्रजी भाषा संभाषण शिबिराचा समारोप

आटपाडी | चांगभलं वृत्तसेवा
ग्रामीण भागात इंग्रजी बाबत विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शालेय जीवनात इंग्रजी हा विषय म्हणून नव्हे, तर भाषा म्हणून शिकवणे गरजेचे आहे, असे मत प्रा. सुनील आयवळे यांनी व्यक्त केले.
बेसिक इंग्रजी व्याकरण व संभाषण कौशल्य शिबिराच्या समारोप कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा घरनिकी ता. आटपाडी येथे ग्रामस्थांच्यावतीने प्रशिक्षक श्री सुनिल तानाजी आयवळे सर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गावचे सरपंच आप्पासाहेब पवार, विक्रम दाईंगडे, सलीम शेख, आरपीआय (आठवले) कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा होलार समाज घरनिकी अध्यक्ष सुनिलभाऊ तोरणे, आरपीआय आठवले महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी तोरणे, लालासो तोरणे, गणपत तोरणे, नाथा माने, शिवाजी खैरमोडे, गणेश पवार, दत्ता सोनवणे सर, प्रकाश मेटकरी, सुमित पवार, सामाजिक कार्यकर्त्या रिटा माने मॅडम व सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशिक्षक प्रा.सुनिल तानाजी आयवळे सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने आरपीआय (आठवले) कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा होलार समाज घरनिकी अध्यक्ष सुनिलभाऊ तोरणे व लालासो तोरणे यांचा सत्कार करण्यात आला.