डॉ.अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणमधील मांड नदी दुष्काळातही दुथडी भरून वाहू लागली

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
ऐन दुष्काळात डॉ . अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून वाकुर्डे योजनेचे पाणी कराड दक्षिणच्या दक्षिण मांड खोऱ्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाले आहे. या पाण्याने उंडाळे तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे.
वाकुर्डे योजनेच्या दक्षिण मांड नदीत उंडाळे धरण येथे आलेले पाणी धरणाखालील गावांना सोडण्यात आले. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर सुरेश सुकरे, टाळगाव गावचे माजी सरपंच अण्णासाहेब जाधव, साळशिरंबे गावचे माजी उपसरपंच पै.जयवंत यादव, पंकज पाटील, जिंती गावचे उपसरपंच जयवंतराव शेवाळे, ओंड गावचे व्ही. टी. थोरात (सर), मनव गावचे उपसरपंच दादासो शेवाळे, नांदगाव गावचे सरपंच हंबीरराव पाटील, घोगाव गावचे उपसरपंच निवास शेवाळे, मनव गावचे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संताजी शेवाळे, दिनकर पाटील, पै.अविनाश थोरात, पोपट साळुंखे, प्रवीण साळुंखे, योगेश पाटील, संतोष पाटील, मारुती शेवाळे, पै.अभिजित थोरात, अशोक पाटील, काशिनाथ पाटील, वैभव पाटील, मयूर जाधव, सागर जाधव ,रवींद्र सपकाळ, राजेश पाटील, रामचंद्र मुळीक, शहाजी पाटील, आबासो शेंडगे, जाधव सर, धनाजी शेवाळे यांच्याबरोबरच सर्व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
या पाण्याचे पूजन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांनी याबाबत डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले आहेत.