अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी महिलांना दिशा – माजी आमदार रुपनवर
१४६ महिलांना 'अहिल्या रत्न' पुरस्कार, महाराष्ट्रातील ऐतिहासिक सन्मान सोहळा!"

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
“अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजात जागवण्याची आज मोठी गरज आहे. बहुजन समाजाने त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले.
ते कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन सभागृहात ‘अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट’ व ‘ऑल इंडिया धनगर समाज महासंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४६ महिलांना ‘आदर्श माता पुरस्कार’ आणि ‘अहिल्या रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा महाराष्ट्रातील मोठा महिला पुरस्कार वितरण सोहळा ठरला.
यावेळी सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बळवंतराव पाटील, अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
प्रवीण काकडे, उद्योजक बाळासाहेब खरात , श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य उत्तमराव गलांडे, श्रीमंत योगीराज संजय गायकवाड , साताऱ्याचे माजी नगरसेवक अशोकराव शेडगे, उद्योजक हनुमंतराव दुधाळ, आरटीओ निरीक्षक सौरभ दडस, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, मुंबईचे म्हाडा विभागाचे अधिकारी शंकरराव वीरकर, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजी काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती
माजी आमदार रामहरी रुपनवर पुढे म्हणाले,
“अहिल्यादेवींचा इतिहास जाती-धर्मापुरता मर्यादित नव्हता. त्या छत्रपती शिवरायांनंतर लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या एकमेव स्त्री शासक होत्या. त्यांनी देशात ५००० मंदिरे उभारली, महिलांची पहिली सैनिकी फौज स्थापन केली, आणि २९ वर्षे समाजहितासाठी समर्पित राज्यकारभार केला. त्या स्त्री म्हणून जन्मल्या, पण वाघीण म्हणून जगल्या!”
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १४६ महिलांना ‘आदर्श माता’ व ‘अहिल्या रत्न’ या सन्मानाने गौरवण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील महिलांचे योगदान ओळखून, ट्रस्टने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हा भव्य सोहळा यशस्वी केला.
प्रारंभी प्रास्ताविक प्रवीण काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन एम.डी. दडस यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दिलीप बरकडे , प्रा. शितल काकडे , सतिश थोरात , आनंदराव कचरे , रामचंद्र पुकळे , तुकाराम कोकरे, बाबुराव शेडगे , अंकूश मोरे , दत्ता खरात , विष्णू हुलवान, बाबासो काकडे, कैलास काकडे , मृणाल दडस , नारायण कोकरे , अजित ताटे , इंद्रजित ताटे, सुजीत गलांडे , अर्जुन चव्हाण यांनी परिश्रम घेतले.