मुंबईसह सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई, चांगभलं वृत्तसेवा | १९ जून, २०२५
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मुंबई, रायगड, रत्नागिरीसह पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये (१९ जून सकाळपर्यंत) राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. मुंबई शहरात सर्वाधिक १४२.६ मिमी पाऊस पडला असून, त्यापाठोपाठ रायगड (१३४.१ मिमी) आणि पालघर (१२०.९ मिमी) जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.
<span;>राज्यातील प्रमुख पावसाच्या नोंदी (१९ जूनपर्यंत):
मुंबई शहर – १४२.६ मिमी
रायगड – १३४.१ मिमी
पालघर – १२०.९ मिमी
ठाणे – ९०.३ मिमी
रत्नागिरी – ६०.९ मिमी
पुणे – २९.३ मिमी
सातारा – १७.७ मिमी
राज्यातील काही इतर भागांत तुरळक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सावधगिरीचा सल्ला:
• नदीकाठच्या वस्तीतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे
• शक्यतो घरातच थांबावे, अनावश्यक प्रवास टाळावा
• प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.