सातारा, सांगली, कोल्हापूरसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान ; लोकसभा निवडणुकीचा 04 जून रोजी निकाल लागणार – changbhalanews
राजकियराज्य

सातारा, सांगली, कोल्हापूरसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान ; लोकसभा निवडणुकीचा 04 जून रोजी निकाल लागणार

चांगभलं ऑनलाइन | नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात पुढील प्रमाणे मतदान होईल…..
पहिला टप्पा – शुक्रवार, दि.19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – शुक्रवार, दि. 26 एप्रिल बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – मंगळवार, दि. 7 मे रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – सोमवार, दि. 13 मे नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा- सोमवार, दि. 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई

निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की,, १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तिथेही निवडणुका होणार आहेत.

१०.५ लाख पोलिंग बूथ असून ९७ कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. ५४ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

* यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी १.८२ कोटी नवमतदार आहेत

* ४८ हजार तृतीयपंथी मतदार

* १०० वर्षांवरील मतदार २ लाख

* ४९.७ कोटी पुरुष मतदार

* ४७.१ कोटी महिला मतदार

* १८ ते २१ वयोगटातील २१.५० कोटी मतदार

*८२ लाख प्रौढ मतदार

* महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे.

निवडणुकीत मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली असून जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना केल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. या निवडणुकीत हिंसा आणि पैशांचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close